जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वत्र मिठाईचे, खासकरुन जिलेबीचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दक्षता घेण्यात आली आहे. कोरोनाचा फटका जिलेबीला, जिलेबी व्यावसायिकांना तसेच जिलेबीची चव चाखू इच्छिणाऱ्या सर्वांनाच बसला आहे. यामुळे बहुतेकांना जिलेबीपासून वंचित रहावे लागणार आहे.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या